Thursday, October 7, 2021

श्रीगीतामंजूषामंथन परिकल्पना एवं १ से १० मंथनोंका वृत्तांत -हिंदी व मराठी

 

श्रीगीतामंजूषामंथन

परिकल्पना एवं १ से १० मंथनोंका वृत्तांत (कृते कौशलम् न्यास)

श्रीगीतामंजूषामंथन

) परिकल्पना

भारतीय संस्कृति का सारभूत भगवद्गीता ग्रंथ है और संपूर्ण देशमें घर-घरमें इसके नित्य पाठकी परंपरा रही है। वर्तमानमें यह परंपरा खंडित होती हुई दिखती है। किन्तु दूसरी ओर गीताका महत्व पुनर्स्थापित होते हुए भी देखा जा सकता है। समाजजीवनको योग्य दिशानिर्देश देने हेतु, साथ ही आधुनिक मैनेजमेंटके लिए एक उद्बोधक ग्रंथके रूपमें गीताका नया आधुनिक रूप विद्वतजनोंको मान्य है। हालांकि आधुनिक पंडित इसके आध्यात्मिक पक्षको हटाकर इसे सेक्यूलर बनाना चाहते हैं। लेकिन हमारा ऐसा मानना है कि नित्य पठन-पाठन वाली परंपरा ही भारतकी औौर गीतामें वर्णित श्रद्धातत्वकी सही पहचान है और उसका पुनर्स्थापित होना आवश्यक है। ऐसा हुआ तो वह एक महत्त्व राष्ट्र कार्य होगा।

श्रीगीतामंजूषामंथन प्रतिभागिता कार्यक्रमके माध्यमसे नई पीढ़ीपर योग्य संस्कार हो सकें, जनसामान्यमें भगवत गीताका पठन-पाठन पुनः आरंभ हो, कमसे कम एक अध्याय मुखोद्गत हो, उन्हें गीताके विषयवस्तुकी तथा संस्कृत भाषाकी भी थोड़ी या अधिक जानकारी हो, इन्हीं उद्दिष्टोंको लेकर आयोजन किया जाता है। हम आशा करते हैं कि इससे समाजमें गीताके आचरणका संस्कार वृद्धिंगत होगा।

आरंभ एवंं सहयोग

कौशलम् न्यासकी ओरसे श्रीगीतामंजूषामंथन का प्रस्ताव तैयार कर प्रमुख आर्थिक भार व संयोजनका जिम्मा स्वीकारा गया। प्रस्तावका अभिनव रूप जानकर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, भारत विकास परिषद, तथा संस्कृत भारती इन तीनोंने भी अपना सहयोग देनेके लिए आश्वस्त किया। विविध आयामोंपर विचार करनेहेतु कतिपय आरंभिक बैठकोंके पश्चात् श्रीगीतामंजूषामंथन का पहला आयोजन दिनांक ५ जून २०१८ को संपन्न हुआ।

श्रीगीतामंथन आयोजन किस प्रकार होता है

हमारे इस कार्यक्रममें प्रतिभागियोंके लिये एक प्रश्नोत्तरी होती है। भगवद्गीताके श्लोकोंका पठन, थोड़े शब्दार्थ, थोड़ा व्याकरण और थोड़ा महाभारतसे संबंधित जानकारी तथा गीताका सरल भावार्थ इस प्रकार पांच विषयोंके प्रश्न चुने जाते हैं। इच्छुक प्रतिभागी अपना ४ व्यक्तियोंका गुट बनाकर एक अध्याय कंठस्थ करते हैं और अन्य तैयारीके साथ आयोजनमें भाग लेने के लिए हमसे संपर्क करते हैं। एक आयोजनमें पांच गुटोंको सहभागी किया जाता है, जबकि अन्य गुटोंको अगले आयोजनमें अवसर दिया जाता है। स्वागत, भाषण, प्रश्नोत्तरी, पुरस्कार वितरण इत्यादिसहित तीन घंटेका समय रखा गया है।

जिन चार सदस्योंने आरंभसे ही इस कार्यक्रमकी जिम्मेदारी संभाली है और अपना समय दिया है वे हैं - श्रीमती सुनीता फडके, श्री नीलेश घोड़के, श्रीमती अनुजा चोपडे तथा श्री अमित मोकर।

भांडारकर संस्थाद्वारा यजमानपदका निर्वाह --

श्रीगीतामंजूषामंथन आयोजनके प्रथम ग्यारह पुष्प भांडारकर संस्थाके विशाल सभागृहमें गूँथे गए। इन कार्यक्रमोंमें स्वयं प्रतिभागी गुट, बाल- प्रतिभागी, मंचासीन सदस्य व अन्य प्रेक्षकगण इत्यादि लगभग १०० व्यक्ति शामिल होते रहे। प्रत्येक आयोजनपर संस्थाके मानद सचिव एवं अन्य सदस्योंने स्वयंकी उपस्थितीसे शोभा बढाई, साथ ही प्रेस पब्लिसिटी, वीटियो रेकॉर्डिंग, आगंतुकोंका स्वागत, चाय पान आदि कई छोटीमोटी व्यवस्थाएँ करीं। कौशलम् न्यास, भारतविकास परिषद एवं संस्कृत भारतीने अन्य जिम्मेदारियाँ निभाईं। प्रेक्षकोंमें किसीकिसीने स्वयं प्रेरणासे अल्पस्वल्प आर्थिक सहयोग भी दिया।

कार्यक्रमका आरंभ शंख वादनसे होता है और आज तक सभी कार्यक्रमोंमें श्री सिधये महोदयने हमारे लिए शंख वादनके साथ कार्यक्रमका शुभारंभ करवाया है। इसी प्रकार भारत विकास परिषदकी ओरसे श्री मंदार जोग तथा न्यासकी ओरसे श्रीमति फडकेने सम्मिलित रूपसे सभी कार्यक्रमोंमें सूत्रसंचालन किया है। संस्कृत भारती, भारत विकास परिषद एवं भांडारकर संस्थाके प्रमुख पदाधिकारी कार्यक्रममें नियमित रूपसे अपनी उपस्थिति दर्ज कराते हैं।

कोरोना संक्रमणके बाद

कोरोनाके फैलावके कारण प्रत्यक्ष कार्यक्रम रोकते हुए १५ अगस्त २०२० के शुभ दिन ऑनलाइन पद्धतिसे आयोजन आरंभ किया। १४वां पुष्प दिनांक ७ अगस्त २०२१ को गूँथा जा रहा है। ऑनलाइनका यह लाभ रहेगा कि आगे इसमें पुणे शहर अथवा महाराष्ट्रके बाहरसे भी लोग शामिल हो सकेंगे।

प्रश्नों का स्वरूप

श्लोकपठन – दिये गये चरणके अनुसार एक अथवा लगातार तीन श्लोक शब्दार्थसे श्लोकार्थ तक महाभारत से संबंधित जानकारीपर प्रश्न एवं व्याकरण दृष्टिसे वचन, लिंग, पुरुष, विभक्ति की पहचान, काल अथवा लकारकी पहचान। संधि जोड़ना और संधि विच्छेद, समास, धातुसाधित शब्द इस प्रकार व्याकरणके सरल स्तरके प्रश्न पूछे जाते हैं। (चौदहवें आयोजनके प्रश्न संलग्न हैं)

अंतमें परीक्षक सभी गुटोंके अंक के आधारपर अपना निर्णय देते हुए विजेता घोषित करते हैं। सभीको छोटे-बडे पुरस्कार व प्रमाणपत्र दिये जाते हैं। कुछ प्रश्न प्रेक्षकोंसे पूछे जाते हैं और वे भी प्रश्न पूछें इसके लिये उत्साहित किया जाता है। उन्हें भी छोटे पुरस्कार देते हैं।

१४वे पुष्पमें पहली बार ऐसा होगा जब चारों गुट बाल प्रतिभागियोंके ही होंगे।

जुडे हुए कार्य़क्रम

)गीतामंथनके साथ-साथ इस कार्यक्रममें दो तीन बातें और शामिल हैं। एक है बाल सहभागिता। कई बार छोटे बच्चोंकी तैयारी इस पूरी प्रतियोगितामें भाग लेने लायक नहीं होती परंतु उन्होंने कोई स्तोत्र-पठन सीखे होते हैं। ऐसे बच्चोंको हम कार्यक्रमके अंतरालमें अपनी प्रस्तुतिका अवसर देते हैं।

) कार्यक्रममें उपस्थित सभीसे आग्रह किया जाता है कि वे भगवद्गीताका एक अध्याय हस्तलिखित करके हमें दें, इनको भांडारकर संस्थामें संग्रहित किया जायगा। अबतक ऐसे ३६ हस्तलिखित आ चुके हैं।

) कार्यक्रममें उपस्थित बच्चोंको शंखवादन सीखनेहेतु प्रोत्साहित किया जाता है। श्री सिधये उनके लिये १ सप्ताहकी ट्रेनिंग चलाते हैं।

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

श्रीगीतामंजूषामंथन

श्रीगीतामंजूषामंथन प्रतिभागिता या माध्यमातून नवीन पिढीवर योग्य संस्कार घडावेत, जनसामान्याला गीतेचा एक तरी अध्याय पाठ व्हावा गीतेबद्दल सामान्य ज्ञान तसेच संस्कृतचे थोडे ज्ञान वाढावे हे उद्दिष्ट समोर ठेवून श्रीगीतामंजूषामंथनाचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे समाजात गीतेच्या आचरणाचे संस्कार वाढतील अशी अपेक्षा आहे.

आरंभ व सहयोग....

कौशलम् न्यासाच्या वतीने श्रीगीतामंजूषामंथनाचा प्रस्ताव आखण्यात आला होता. भाडारकर संस्था, भारत विकास परिषद व संस्कृत भारती यांनी या प्रस्तावाचे अभिनव रूप ओळखून या आयोजनात सहभागी होण्याची संमति दिली. या अनुषंगाने विविध आरंभिक बैठका व प्रयत्नांनंतर श्रीगीतामंजूषामंथनाच्या पहिल्या पुष्पाचे आयोजन दि. 5 जून 2018 रोजी करण्यात आले.

गीतामंथन या प्रकारे असते....

या मंथनात कोणत्याही एका अध्यायातील श्लोकांचे पाठांतर, काही शब्दार्थ, थोडे व्याकरण, आणि गीतेच्या अनुषंगाने अवांतर प्रश्नोत्तरे असे स्वरूप आहे. जे नवीन प्रतिभागी होण्यास इच्छुक असतील त्यांनी आपला चार जणांचा एक गट तयार करावा. तसेच गीतेतील एक अध्याय निवडून त्याचा अभ्यास करावा. गटाचे नाव व निवडलेला अध्याय आम्हाला कळवावा. आयोजनाच्या वेळांत एका दिवशी पाच गट सहभागी होऊ शकतात तर उर्वरित गटांना पुढच्या पुष्पात संधी मिळते.

संपर्कासाठी मो. नं– १.सौ. सुनिता फडके ८८८८२३४४४४ २. श्री. निलेश घोडके ९८२२६५९२०९ ३. सौ. अनुजा चोपडे ९८५०६४२३५३ ४. श्री. राघवेंद्र देशपांडे ९८५०७७०१४५ ५. कु. अमित मोकर ८३९०३२४८५९ 6. सौ उषा पाठक 9860015853 (नाशिकसाठी)

श्रीगीतामंजूषामंनाच्या गेल्या वर्षभरात झालेल्या दहा पुष्षांना भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. लोकांनी यामध्ये प्रतिभागी, प्रेक्षक व बालप्रतिभागी म्हणून चांगल्या प्रमाणात सहभाग दर्शविला. या मंथनांसाठी तज्ज्ञ या नात्याने उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी देखील या आयोजनाबाबत समाधान दर्शविले. अशी शंभर पुष्पे आयोजित करण्याच्या संकल्प भांडारकर संस्थेने बोलून दाखविला व सर्वानी त्यास अनुकूल मत दर्शविले.

हस्तलिखिते

श्रीगीतामंजूषामंन उपक्रमासोबत हस्तलिखिते लिहून देण्याचा देखील उपक्रम घेण्यात येतो. गीतेतील एका किंवा अनेक अध्यायाचे हस्तलिखित करून ते मंथनाच्या वेळी दिली जातात व त्या हस्तलिखितांचा संग्रह भांडारकर संस्थेत करण्यात येतो. आतापर्यंत 20 हस्तलिखितांचा संग्रह करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना हस्तलिखिते द्यायची आहेत त्यांनी ती लिहून आम्हाला श्रीगीतामंजूषामंनाच्या कार्यक्रमावेळी द्यावी.

यू-ट्यूब व फेसबुक

श्रीगीतामंजूषामंनाच्या प्रत्येक पुष्पाचे विडिओ शूटिंग केले जात असून ते यूट्यूब वर श्रीगीतामंजूषामंथन या नावावर उपलब्ध आहेत. आपल्याला मागील कार्यक्रम पहायचे असल्यास खालील लिंक वर पाहू शकता.

https://www.youtube.com/playlist?list=PL507RMth7dlutPmd8g4j_FwjOZe3sJBcv

तसेच फेसबुकवर देखील श्रीगीतामंजूषामंथन या नावाने पान आहे त्यावरही प्रेक्षक या उपक्रमाशी जोडले जाऊ शकतात.

पुढील योजनेसाठी आवाहन....

या पुढे हे मंथन असेच चालू राहणार आहे, आपण सर्व यामध्ये सहभागी होऊ शकता. आपण आधीचे प्रतिभागी असाल तर पुढील पुष्पात नवीन अध्याय घेऊन आपण त्यात सहभागी होऊ शकता. आपण यामध्ये प्रतिभागी, प्रेक्षक, व बालप्रतिभागी म्हणून उपस्थित रहावे व आयोजकांचा आणि सहभागींचा उत्साह वाढवावा.

एकूणात....

श्रीगीतामंजूषामंनच्या झालेल्या दहा पुष्पामध्ये एकूण ४२ गट सहभागी झाले होते. या गटांपैकी पाट गट शालेय मुलांचे होते. सरासरीने प्रत्येक पुष्पाला ४०-५० प्रेक्षकांची उपस्थिति लाभून आतापर्यंत सुमारे साडेतीनशे प्रेक्षकांनी उपस्थिती राखली आहे. मंथनात साधारणतः एका गटाला २० ते ३० प्रश्न विचारले जातात. तसेच प्रेक्षकांना देखील प्रश्न विचारण्यात येऊन ज्यांनी अचूक उत्तरे दिल्यास त्यांना लगेचच बक्षिस दिले जाते. उपस्थित मान्यवर व प्रेक्षक देखील प्रतिभागी गटांना प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते व ही खेळीमेळी रंजक ठरते.

मंथनाची सुरवात शंखनादाने केली जाते यासाठी श्री मधुकर शिधये हे प्रत्येक वेळेस आपल्या सहकाऱ्यांसोबत उपस्थित राहत असून त्यांच्या शंखनादाने मंथनाची सुरवात होते. तसेच काही बालसहभागी गटात सहभागी होऊ शकत नाहीत परंतू त्यांना एखाद्या अध्यायातील काही श्लोकपाठाचे सर्वांसमोर आवर्तन करण्याची संधी हवी असते व ती दिली जाते जेणेकरून त्यांना या मंथनातून एक अनुभव व प्रेरणा मिळेल. याप्रमाणे बालप्रेक्षक गीतेतील अध्याय किवा प्रार्थना म्हणतात व प्रश्नोत्तरास सुरवात होते.

आत्तापर्यंत झालेल्या पुष्पामधील सर्व ४२ गटांची नावे व सहभागींची सूची सोबत जोडलेली आहे. तसेच यामध्ये खालील प्रमाणे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष लाभले.

अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून यांनी काम पाहिले…

श्रीमती शैलजा कात्रे , श्री वसंतराव गाडगीळ, श्री दत्ताजी चितळे , श्री अनंत धर्माधिकारी, श्री उमाकांत थिटे, श्री रविंद्र मुळ्ये, श्री संजय चांदेकर, श्री शिरीष भेडसगावकर, श्री प्रणव गोखले, श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, श्री अशोक कामत, श्रीमती मंगला मिरासदार, श्री श्रीपाद भट, श्रीमती माधवी गोडबोले, सौ. भाग्यश्री भागवत, श्री स्वामी श्रीकांतानन्दजी, श्री प,. जोशी, श्री भुपाल पटवर्धन.

परीक्षक म्हणून यांनी काम पाहिले…

श्री रविंद्र मुळ्ये, श्रीमती वीणा लोंढे, श्री लक्ष्मण मोहरीर, श्री प्रसाद पाठक, श्री श्रीनंद बापट, सौ योगिता जोग, सौ वर्षा गानू, श्रीमती मुक्ता गरसोळे, श्री राघवेंद्र देशपांडे, डॉ मुग्धा गाडगीळ, श्रीमती निधी वडेर, सौ मुक्ता मराठे, सौ. धनश्री शेजवलकर, सौ.उज्वला देशपांडे, श्री रोहन कुलकर्णी.

प्रश्नकर्ते म्हणून लाभले

सौ सुनिता फडके, सौ आरती गोखले, सौ सायली काळे, सौ शितल कावूर व श्री केशव नांदेडकर.

शिवाय एकूण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मंदार जोग, सौ अमृता नातू, सौ सुनिता फडके व श्री राघवेंद्र देशपांडे यांनी केले.

श्रीगीतामंजूषामंथनाच्या कार्यक्रमाला कौशलम् न्यास, भांडारकर संस्था, भारत विकास परिषद व संस्कृत भारती यांचे मुख्य प्रतिनिधीची उपस्थिती कायम असते व यांच्यामार्फत सर्वांचे स्वागत केले जाते.

या झालेल्या पुष्पामध्ये खालील बालप्रेक्षकांनी अध्याय व प्रार्थना म्हटल्या.

कु शरण्या घुबे, कु उन्मनी भोसले, कु उर्वी मेढेकर, कु अध्वय मराठे, कु आयुष राजाध्यक्ष, कु सौम्या फडके, कु संहिता फडके, कु अनुष्का लक्कड, कु अदित्य भालेराव, कु देवेश गोखले, कु शुक्तिका मल्ल्या, कु ओंकार श्रीरसागर, कु चित्रलेखा गायकवाड, कु राजेश्वरी गायकवाड,

सहाय्य....

श्रीगीतामंजूषामंथन कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन कौशलम् न्यासातर्फे केले जाते. भांडारकर संस्था आयोजनास कायम पाठबळ देत असून शिवाय संस्थेच्या वतीने हॉल, विडिओ रेकॉर्डींग, चहापान, वृत्तपत्रात प्रसिद्धि इत्यादी सहाय्य होत आहे. तसेच किमया ग्रुप कडून 20000 रूपये श्रीगीतमंजूषामंथनाच्या चार आयोजनासाठी मिळाले होते व पुढील आयोजनाची सर्व आर्थिक जबाबदारी कौशलम् न्यासाने स्वीकारली आहे.

भारत विकास परिषद व संस्कृत भारती च्या वतीने मंथनासाठी गटबांधणी व प्रतिभागी संपर्क करण्यात येतो.

विशेष सहाय्य....

आतापर्यंतच्या आयोजनांना भांडारकरचे कर्मचारी श्री राजू गायकवाड व सौ अश्विनी यांचे खूप चांगल्या प्रकारे व सर्वच कामामध्ये सहाय्य श्रीगीतामंजूषामंथनास मिळाले आहे. तसेच भांडारकरच्या वतिने श्री प्रसाद व कु सागर यांनी विडीओ शुटिंग साठी सहाय्य केले. मंथनाच्या प्रसिद्धिसाठी व तसेच त्याची बातमी वृत्तपत्रात देण्यासाठी एकविरा पब्लिकेशन यांचे सहाय्य लाभले व त्यांनी पुढेही मदत करत राहू असे सांगितले. तसेच प्रेक्षकांपैकी कित्येकांनी आयत्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लहानमोठे आर्थिक व इतर सहाय्य केले आहे. त्यामध्ये श्री अनिल पारगावकर, श्री केशव नांदेडकर, श्री सुधीर फडके, सौ मीरा मेढेकर, श्री बर्वे व सौ अनुरेखा देशमुख अशा व्यक्तिचे सहाय्य मंथनला लाभले आहे. या सर्वांची या आयोजनात खूप मदत मिळते पुढेही मिळत राहील.

  • श्रीगीतामंजुषामंथन पुष्प ११ दि. ३१ जानेवारी,२०२० रोजी भांडारकर संस्थेच्या टाटा सभागृहात गुंफण्यात आले होते. तसेच श्रीगीतामंजुषामंथन पुष्प १२ हे दि १५ ऑगस्ट, २०२० रोजी प्रथमता ऑनलाईन पद्धतिने गुंफण्यात आले. त्याप्रमाणे श्रीगीतामंजुषामंथन पुष्प १३ हे देखील ऑनलाईन पद्धतीने दि १९ डिसेंबर,२०२० रोजी घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे पुष्प ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत पुढे जो पर्यंत याचा प्रादुर्भाव कमी होत नाही तो पर्यत पुढील पुष्प देखील ऑनलाईन पद्धतीने घण्यात येतील.

धन्यवाद.



No comments:

Post a Comment